Mi Asach Vagto Thoda Vedyasarkha
मी असाच वागतो ,
थोडा वेड्यासारखा…
तुझ्यात नेहमीच ,
हरल्यासारखा..
“1) एरंड ही वनस्पती अशी आहे की आने, फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त आहे. एरंडाचे कोळसेसुद्धा मसाल्यात घालण्यासाठी वापर करतात. आरोग्याच्या दृष्टीनेही सर्वात उपयुक्त असे हे एरंडेल.तिखट, उष्ण, प्रमेह, गोड, कडू अशा सर्व गुणांचा त्यात समावेश असतो.
2) एरंडाच्या सालीचा रस काढून त्या रसात दूध घालून ते दूध रोज प्यावे त्यामुळे कावीळ होत नाही.
3) भूक लागत नसेल, अस्वस्थता वाटते, अपचन झाले, पोटात दुखत असेल अशा वेळी एरंड मुळाचा काढा एक अष्टमांश करावा व त्यामध्ये हिंग, पादे लोण व सुंठीची पूड घालून चार सत्पके द्यावा.
4) कंबर दुखत असेल, खाली वाकता येत नसेल, चमक मारत असेल अशा वेळी वेली एरंडमूळ व सुंठ यांचा काढा करावा. या काढय़ामध्ये दोन ते तीन गुंजा जवखार घालून तो रोज घेत जावा याने कंबरदुखी थांबते.
5) हात, पाय, नाभी यांना सूज येते, सांधे ढिले पडतात. अशा वेळी एक कप ताजे गोमुत्र घ्या. त्यात दोन तोळे एरंडेल तेल घाला व दररोज प्या त्यामुळे जुलाब होऊन पोट साफ होईल.
6) कावीळसाठी सर्वात गुणकारी व उपयुक्त असे हे एरंडेला आहे त्यामुळे कशाप्रकारची पण कावीळ असो, लवकर बरी होते, तर घरच्या घरी करू शकतो आपण या बहुगुणी एरंडेलचा वापर.
7) एरंडमूळ वातशमनासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
8) एरंडेल तेल तर कोठा साफ होण्यासाठी प्रसिद्ध आहेच.
9) एरंडाची पानेसुद्धा शेकासाठी, पंचकर्मातील वातशामक उपचारांसाठी वापरली जातात;
10) तसेच यकृताची कार्यक्षमता वाढविण्यासाठीसुद्धा उपयोगी असतात.”
“1) आलं आणि गवती चहा घालून केलेला चहा अनेक छोट्या-मोठय़ा तक्रारींवरचा रामबाण उपाय आहे.
2) सर्दी, डोकेदुखी, अंगातली बारीक कणकण घालवण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय म्हणावा लागेल.
3) गवती चहाला पातीचा चहा असेदेखील म्हणतात. याला एक विशिष्ट सुगंध असतो. घाम येऊन तापाचा निचरा होण्यासाठी गवती चहा विशेष गुणकारी आहे.
4) गवती चहा, सुंठ, मिरे आणि दालचिनी यांचा अष्टमांश काढा घेतल्याने सर्दी-पडसे, थंडी वाजून ताप येणे आदी विकार नाहीसे होतात.
5) तापात घाम येण्यासाठी गवती चहाचा वाफारा दिला जातो. हा वाफारा घेतल्यास ताप झटक्यात कमी होतो आणि अंगदुखी थांबते.
6) गवती चहापासून तेलही काढतात. हे तेल संधिवात आणि वाताने अंग दुखण्यावर अत्यंत गुणकारी आहे. हे दुखणे असणार्या व्यक्तींनी सकाळ-संध्याकाळ गवती चहाच्या तेलाने मालीश केल्यास संधिवात बरा होतो, अंगदुखी थांबते.
7) गवती चहा कॉलरावरचा प्रतिबंध करण्यासाठीदेखील वापरला जातो.”